धरणगावात शिव संवाद यात्रेचे फलक फाडल्याने कार्यकर्ते संतप्त

धरणगावात शिव संवाद यात्रेचे फलक फाडल्याने कार्यकर्ते संतप्त

बातमी शेअर करा

धरणगावात शिव संवाद यात्रेचे फलक फाडल्याने कार्यकर्ते संतप्त

धरणगाव युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जळगांव जिल्हा “शिव संवाद” यात्रा दौरा आज दि.२० ऑगस्ट, शनिवारी दुपारी १-०० वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना व युवा सेना कडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत फलक (बॅनर) जागोजागी लावल्याचे दिसून येत आहे. मात्र काही अज्ञातांकडून आज मध्यरात्री १२ वाजेदरम्यान शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर, व उड्डाण पुलाजवळ शिव संवाद यात्रेचे स्वागत बॅनरवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बॅनर फाडल्याचा प्रकार धरणगावात पाहायला मिळाला. जवळपास सहा ते सात ठिकाणी हे बॅनर फाडण्यात आले आहेत. प्रथम दर्शनी द्वेष भावनेतून शिवसेना, युवासेनेचे स्वागत फलक (बॅनर) फाडल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेमुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या या शिव संवाद यात्रेचे बॅनर अज्ञातांनी नक्कीच द्वेष भावनेतून फाडले असल्याची शंका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित केल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट दिसत असून शहरात मोठ्ठा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ व कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष देविदास बापू महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, किरण अग्निहोत्री, रविंद्र जाधव, भरत माळी, आदिंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सूचना दिल्या.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम